ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चंद्रयान 2 : अखेरच्या टप्प्यात  ऐतिहासिक मोहिमेत अडथळा

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 07, 2019 11:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30

चंद्रयान 2 : अखेरच्या टप्प्यात  ऐतिहासिक मोहिमेत अडथळा

शहर : bangalore

22 जुलै पासून भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. चंद्रावर नियोजित कार्यक्रमानुसार उतरून 7 सप्टेंबरला भारत एक इतिहास रचणार होता. मात्र ऐन शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडरसोबत संपर्क तुटला. आणि चंद्रयान 2 च्या मोहिमेत मोठा अडथळा निर्माण होऊन इतिहास होता होता राहिला.

मध्यरात्री 1.30 ते 2.30 वाजताच्या दरम्यान विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण धृवावर  उतरणार होते. त्यानंतर 2 तासाने प्रज्ञान रोवर बाहेर येणार होते. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. पंत प्रधान नरेंद्र मोदी ही खास ह्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इस्रोच्या सोबत होते. तसेच इतर मान्यवरही ह्या घटनेकडे लक्ष होऊन ठेवून होते.

मात्र शेवटच्या टप्प्यात चंद्रापासून 2.1 किमी लांबीवर असताना विक्रम लँडरचा संपर्क अचानक तुटला. त्यामुळे शास्त्रज्ञाची पूर्ण कसोटी लागली. अख्या जगाच लक्ष चंद्रयान 2 वर लागून होते. अजूनही 'विक्रम' सोबत संपर्क होऊ शकलेला नाही. इस्रोचे शास्त्रज्ञ माहिती विश्लेषण करून सातत्याने विक्रम लँडर सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.

यावेळी इस्रो प्रमुख के. सीवन यांना अश्रु अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना "मी आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे." असे म्हणून त्यांचा धीर दिला.

 

 

मागे

चाळीस लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या  वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना करातून सुट - सुधीर मुनगंटीवार
चाळीस लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या  वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना करातून सुट - सुधीर मुनगंटीवार

वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या ज्या व्यापाऱ्य....

अधिक वाचा

पुढे  

आर्य हे भारतीयच असल्याचे सिद्ध
आर्य हे भारतीयच असल्याचे सिद्ध

चंडीगढ आता पर्यंत आर्य हे खैबरखिंडीतून भारतात आले. त्यांनी येथील मुळच्या (द....

Read more