ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उद्धव ठाकरे हा दानशूर व्यक्ती, तुमच्यासारखा भिकारी नाही; अब्दुल सत्तारांचा भाजपवर घणाघात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 24, 2021 10:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

उद्धव ठाकरे हा दानशूर व्यक्ती, तुमच्यासारखा भिकारी नाही; अब्दुल सत्तारांचा भाजपवर घणाघात

शहर : धुळे

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विरोधकांना लक्ष्य केले. भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला.

ते रविवारी धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले. भाजपने दगा केला नसता तर आज राज्यात युतीची सत्ता असती. भाजप हा गरीबांचा नव्हे तर उद्योगपतींचा पक्ष आहे. राम मंदिराच्या नावाने निधी संकलन करणाऱ्या भाजपने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानायला हवेत, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

‘सत्ता पडण्याची वाट पाहणारे हँग झाले

महाविकासाघाडीचे सरकार पडण्याची वाट पाहणारे हँग झाले आहेत. गेल्या 16 महिन्यांपासून सरकार आहे तिथेच आहे, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना लक्ष्य केले. माझं नाव सत्तार आहे, मी सत्तेतच राहणार, अशी शाब्दिक कोटीही त्यांनी केली. तसेच आगामी काळात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

धुळे महानगरपालिकेवर भगवा फडकवणारच

आगामी निवडणुकीत धुळे महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. धुळे महानगरपालिकेत शिवसेनेचे 55 नगरसेवक निवडून येतील. शिवसैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याला शिव दरबार भरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचाळांमध्ये कृतीतून बोलणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे

सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. बोले तैसा चालेल त्याची वंदावी पाऊले. लॉकडाऊनदरम्यान मंदिरे सुरु करण्यासंदर्भात मागणी होत होती. मात्र त्यावेळी धर्म म्हणजे केवळ मंदिर नाही, अशाप्रकारे परिस्थिती उद्धव ठाकरेंनी हाताळल्याचे सांगत शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते.

मागे

शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार; आंदोलन पेटणार?
शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार; आंदोलन पेटणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या 25 जानेवारी रोजी दिल्लीत....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण!
मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण!

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्....

Read more