ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अजित पवार यांचा राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारवर जोरदरा हल्लाबोल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2019 11:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अजित पवार यांचा राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारवर जोरदरा हल्लाबोल

शहर : पुणे

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघाचा आढावा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारवर जोरदरा हल्लाबोल चढवला. कोणतेही काम असेल तर ते करत नाहीत. केवळ अटी टाकून ते काम कसे रखडले जाईल, असेच धोरण अवलंबते. हे सरकार अटींचे सरकार आहे. आरक्षणाला अट, चारा छावणीला अट,प्रवेशाला अट, प्रवेशाला अट यातून कोणाचंही भलं होणार नाही, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी केली.

फक्त व्हिडीओ कॉन्फरसिंग करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर उतरावे लागेल. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी मंत्री फिल्डवर जायला घाबरतात. कारण अधिकारी त्याच ऐकत नाहीत. आचारसंहितेचा बावू करतायेत. अनेक अधिकारी लोकप्रतिनिधी प्रदेश दौऱ्यावर गेलेत, अशी सडकून टीका अजित पवार यांनी केली.

ईव्हीएम विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजप सरकार गेले नसते. पण काहींच्या मनात शंका आहे.  मोदीच ढगाचे, ईमेल, डिजिटल कॅमेरा विधान हास्यपद असल्याची टीका केली. ग्रामीण भागातील लोकांना पण न पटणारे, विधान करुन त्यांनी टीका केली.

पुढे  

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी  थंडावणार
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी ....

Read more