ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...आधी पवारांना विचारा, नाहीतर पुढची स्क्रिप्ट बंद होईल; विनोद तावडेंचा राज ठाकरेंना टोला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 07, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...आधी पवारांना विचारा, नाहीतर पुढची स्क्रिप्ट बंद होईल; विनोद तावडेंचा राज ठाकरेंना टोला

शहर : मुंबई

राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का? हे आधी शरद पवार यांना विचारून घ्या, नाहीतर तुमच्या पुढील स्क्रिप्ट बंद होतील,' असा टोला  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाणला आहे.

मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला विनोद तावडे यांनी यावेळी उत्तर दिले. 'हा सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश आहे. हा काही खेळ नाही. खड्ड्यात जायला तो काय मनसे पक्ष आहे का', असा उपरोधिक सवाल विनोद तावडे यांनी केला. तसेच, 'राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का? हे आधी शरद पवार यांना विचारून घ्या, नाहीतर तुमच्या पुढील स्क्रिप्ट बंद होतील,' असा टोला लगावला.

याचबरोबर, स्वतःचे इंजिन बंद पडले आणि हे दुसऱ्यांना मदत करत आहेत अशी टीका विनोद तावडेंनी केली आहे. शिवाय, जे निरुपम राज ठाकरे यांना लुख्खा म्हणाले होते, तेच आता मनसैनिकाना सांगणार निरुपम यांना मतदान करा. हा तर मनसैनिकांवर होणारा अन्याय असल्याचे विनोद तावडे यावेळी म्हणाले.

'बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालणाऱ्याने हा नको म्हणून त्याला निवडून द्या हे सांगण बरोबर नाही. एवढाच अभ्यास पक्षासाठी केला असता तर फायदा झाला असता. आधी कष्ट घेतले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती', असा टोलाही विनोद तावडे यांनी राज ठाकरेंना लगावला.

दरम्यान, कालच्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार प्रहार केला. नरेंद्र मोदींनी देश खड्ड्यात घातल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ते म्हणाले, नेहरू हे देशाचे पंतप्रधान हे महात्मा गांधींनी ठरवले, त्यावेळेला पर्याय ठेवला नव्हता, त्यानंतर जितके देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा लोकांना पर्याय होता का? मग आताच ही पर्यायाची चर्चा का? नरेंद्र मोदींनी जितका देश खड्ड्यात घातलाय, ह्या पेक्षा अजून खड्ड्यात घालणारा कोण येणार आहे?, नरेंद्र मोदींना संधी दिली, त्यांनी देश खड्ड्यात घातला, आता राहुल गांधींना संधी देऊन बघू या, खड्ड्यात घालतील किंवा देशाचे चांगले देखील करून दाखवतील. पण संधी तर देऊन बघू या,असे राज ठाकरे म्हणाले.

मागे

राम आणि हनुमानही चौकीदार; भाजप नेत्याची घोषणाबाजी
राम आणि हनुमानही चौकीदार; भाजप नेत्याची घोषणाबाजी

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून सोशल मीडियावर 'मै भी चौकीदार' य....

अधिक वाचा

पुढे  

माझं घर भरलेलं आहे, तुम्ही तुमचं अगाेदर पाहा ; पवारांचा माेदींना टाेला
माझं घर भरलेलं आहे, तुम्ही तुमचं अगाेदर पाहा ; पवारांचा माेदींना टाेला

माझं घर भरलेले आहे तुमचं घर आगोदर पाहा असा टोला माजी केंद्रीय कृषीमंञी शरद प....

Read more