ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आम्ही सत्तेत आलो तर नीती आयोग बरखास्त करणार, राहुल गांधींची घोषणा

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 30, 2019 11:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आम्ही सत्तेत आलो तर नीती आयोग बरखास्त करणार, राहुल गांधींची घोषणा

शहर : देश

आम्ही सत्तेत आलो तर नीती आयोगच बरखास्त करणार, अशी मोठी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला तर नीती आयोग बरखास्त करण्यात येईल, असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. नीती आयोगाने मोदी सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार करण्याशिवाय काहीही काम केलेले नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस सत्तेत परतल्यानंतर नीती आयोगाच्या जागी अत्यंत छोटा नियोजन आयोग आणण्यात येईल. या आयोगाचे सदस्य देशाचे मोठे अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते लोक असतील. या आयोगात १०० पेक्षाही कमी लोकांचा भरणा असेल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

न्याय योजनेच्या घोषणेनंतर नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी या योजनेविरोधात मत प्रदर्शित केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर अशा प्रकारची कोणती योजना लागू करण्यात आली तर त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. राजीव कुमार यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. 

मागे

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सोनवणे यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सोनवणे यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर प्राणघ....

अधिक वाचा

पुढे  

भाजपाविरोधात फिल्ममेकर्सचा एल्गार; भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन
भाजपाविरोधात फिल्ममेकर्सचा एल्गार; भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन

देशातल्या 100 हून अधिक फिल्ममेकर्सनी भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन &....

Read more