ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभा निवडणूक २०१९ : भाजपचं संकल्पपत्र, अनेक मोठ्या घोषणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 08, 2019 05:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभा निवडणूक २०१९ : भाजपचं संकल्पपत्र, अनेक मोठ्या घोषणा

शहर : देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • वर्षांनी २०२२ मध्ये केलेली कामं देशासमोर ठेवू
  • देशातील तरुणांना योग्य संधी मिळण्यासाठी मोठं लक्ष्य घेऊन जात आहोत.
  • राजकीय आणि शासकीय व्यवस्थेत जी नकारात्मकता आहे. त्या विरोधात निर्णय़ घ्यायचा आहे. सकारात्मक विचार आणण्यासाठी प्रयत्न करु.
  • भ्रष्टाचारमुक्त होण्य़ाच्या दिशेने जाण्याचा संकल्प आहे.
  • स्वच्छता एक जनआंदोलन झालं आणि त्यामुळे अभियान यशस्वी झालं. त्यासाठी मिडिया हाऊस आणि तरुणांचे आभार मानतो. हे कोणत्याही सरकारचं यश नाही.
  • भारतात विकासाला जनआंदोलन करायचं आहे.
  • २०१४ ते २०१९ मध्ये केलेल्या कामांमध्ये सामान्य माणसासाठी गरजेच्या असलेल्या गोष्टी होत्या.
  • मच्छिमारांसाठी बजेटमध्ये एक वेगळ्या मंत्रालय़ाची घोषणा केली होती. पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी आणि सगळ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी या मंत्रालयाची स्थापना करु
  • वन मिशन, वन डायरेक्शनने पुढे जाऊ.
  • २०२२ ला भारताला ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यासाठी आम्ही ७५ संकल्प घेतले आहेत. महापुरुषांनी जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण करु.
  • देशवासियांचा गेल्या वर्षात जो सहयोग मिळाला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो

सुषमा स्वराज

  • मागील ५ वर्षात जगभरात आम्ही विश्वास मिळवला आहे.
  • पाकिस्तानच्या विरोधानंतरही इस्लामिक राष्ट्रांनी भारताचं आमंत्रण रद्द केलं नाही. हे असंच होत नाही. हे मोदींच्या परराष्ट्र दौऱ्यांचं फळ आहे.
  • इस्लामिक राष्ट्राच्या ओआयसी या संघटनेमध्ये भारताला प्रमुख स्थान मिळालं.
  • ३२ वर्षात पहिल्यांदा सऊदी अरेबियाने भारताला प्रमुख पाहुण्य़ाचं स्थान दिलं.
  • ५ वर्षात पंतप्रधान मोदींना ५ मोठे पुरस्कार मिळाले
  • भारताचा प्रभाव मोदींच्या काळात खूप वाढला
  • मोबाईल कंपन्या बनवणाऱ्या आधी ३ कंपन्या होत्या. आज आज १२७ कंपन्या देशात आहेत.
  • आज २९ किलोमीटरचे रस्ते रोज बनत आहेत.
  • आम्ही ३४ कोटी बँक खाती उघडली
  • २०१४ मध्ये आम्ही जे म्हटलं ती विकास कामे करुन दाखवली
  • सगळ्या पक्षांनी घोषणापत्र जाहीर केलं आहे आम्ही संकल्पपत्र घेऊन आलो आहोत

राजनाथ सिंह

  • २०२० पर्यंत स्वच्छ गंगा संकल्प पूर्ण करु - राजनाथ सिंह
  • प्रत्येक व्यक्तिला ५ किलोमीटरमध्ये बँकिंग सेवा पुरवण्य़ाचा संकल्प - राजनाथ सिंह
  • कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करु - राजनाथ सिंह
  • मेडिकल कॉलेज वाढवण्याचा संकल्प - राजनाथ सिंह
  • २०२० पर्यंत सर्व रेल्वे पटरींचं विद्युतीकरण करण्याचा संकल्प - राजनाथ सिंह
  • प्रत्येक घरात शौचालय ९८ टक्के पर्यंत पूर्ण केला आहे - राजनाथ सिंह
  • प्रत्येकाला घर आणि एलपीजी गॅस आणि प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचा संकल्प - राजनाथ सिंह
  • इंजिनियरिंग कॉलेज वाढवू आणि लॉ कॉलेजच्या जागा वाढवू - राजनाथ सिंह
  • सिस्टममध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. लाभ आता थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो. यामुळे मोठा फायदा झाला - राजनाथ सिंह
  • निवडणुकीत होणारा खर्च टाळण्यासाठी सर्व निवडणुका एकत्र घेण्यासाठी देशातील लोकांसोबत चर्चा करुन निर्णय घेऊ - राजनाथ सिंह
  • प्रत्येकाच्या विकासाठी संकल्प घेतला आहे - राजनाथ सिंह
  • देशातील छोट्या दुकानदारांदेखील पेन्शन दिली जाणार - राजनाथ सिंह
  • ट्रेडर्स आणि व्यवसायिकांसाठी राष्ट्रीय व्यापारी आयोग बनवणार - राजनाथ सिंह
  • शेतकऱ्यांना ६० वर्षानंतर पेन्शन लागू करु - राजनाथ सिंह
  • प्रत्येक शेतकऱ्यांना सन्मान निधीचा लाभ मिळेल - राजनाथ सिंह
  • सर्व शक्यता तपासून लवकरात लवकर राम मंदिर देखील बांधू - राजनाथ सिंह
  • देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही - राजनाथ सिंह
  • भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही हवे ते सगळे प्रयत्न करु - राजनाथ सिंह
  • सुरक्षेच्या बाबतीत आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. - राजनाथ सिंह 
  • देशातील जनतेमध्ये मोदींबद्दल विश्वास वाढला आहे - राजनाथ सिंह
  • जगभरातील टॉप ३ देशांमध्ये येणाचा आमचा संकल्प आहे - राजनाथ सिंह
  • आम्ही नव्या भारताचं निर्माण करत आहोत. - राजनाथ सिंह
  • आम्ही १३० कोटी जनतेसाठी हे व्हिजन पत्र समोर ठेवत आहोत - राजनाथ सिंह 
  • अमित शहा
  • मोदींच्या नेतृत्वात जगभरात देशाचा सन्मान वाढवू - अमित शहा
  • आम्ही एक मजबूत आणि निर्णायक सरकार देऊ - अमित शहा
  • काम करणं कठीण असतं. पण मोदी सरकारने या काळात मोठे निर्णय़ घेतले. - अमित शहा
  • ७० वर्षानंतर भारत आज एक महासत्ता झाला आहे. - अमित शहा
  • मोदी सरकार एक पारदर्शी सरकार होती. भारत आज जगात महाशक्ती बनली आहे - अमित शहा
  • मागील ५ वर्षात एकही भ्रष्टाचार झाला नाही- अमित शहा
  • मोदी सरकारच्या काळात जगात सन्मान वाढला - अमित शहा

 

मागे

लोकसभा निवडणुकीचा निकाल उशीरा लागणार; मतमोजणीच्या पद्धतीत मोठा बदल
लोकसभा निवडणुकीचा निकाल उशीरा लागणार; मतमोजणीच्या पद्धतीत मोठा बदल

ईव्हीएम यंत्रातील मतांच्या मोजणीसोबत व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (....

अधिक वाचा

पुढे  

आजम्मू-काश्मीरचे कलम 35 A आणि 370 बद्दल भाजपाचे मोठे श्वासन
आजम्मू-काश्मीरचे कलम 35 A आणि 370 बद्दल भाजपाचे मोठे श्वासन

लोकसभा निवडणूक 2019 साठी भारतीय जनता पार्टीने आपले संकल्प पत्र जारी केले आहे. ....

Read more