ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हातकणंगले मतदारसंघात धक्कादायक निकाल,राजू शेट्टींचा पराभव करत धैर्यशील माने 'जायंट किलर'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 05:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हातकणंगले मतदारसंघात धक्कादायक निकाल,राजू शेट्टींचा पराभव करत धैर्यशील माने 'जायंट किलर'

शहर : कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. हातकणंगले मतदारसंघातून सलग दोनवेळा विजयी झालेले राजू शेट्टी पराभवाच्या छायेत आहे. शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील यांनी जवळपास 1 लाख मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे शेट्टींचा पराभव निश्चित मानला जात आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांपूर्वी शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील यांच्या मातोश्री निवेदिता माने यांचा पराभव केला होता. धैर्यशील यांनी दहा वर्षांनंतर या पराभवचा बदला घेत शेट्टींना अस्मान दाखवलं.

निवेदिता माने 1999 आणि 2004 मध्ये इचलकरंजी मतदारसंघातून निवडून आल्या. राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी होत त्यांनी दिल्ली गाठली. त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यामुळे 2009 मध्ये निवेदिता माने हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. मात्र राजू शेट्टींनी त्यांचा जवळपास 95 हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे त्यांची हॅट्रिक हुकली.

राजू शेट्टींनी 2009 पाठोपाठ 2014 मध्येही विजय मिळवत दिल्ली गाठली. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या कल्लाप्पा आवडेंचा पावणे दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यामुळे यंदा राजू शेट्टींना यंदा हॅट्रिकची संधी होती. मात्र निवेदिता मानेंचे चिरंजीव धैर्यशील यांनी त्यांच्यापुढे आव्हान उभं केलं. सध्या त्यांच्याकडे जवळपास 1 लाख मतांची आघाडी आहे. त्यामुळे माने यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

मागे

Election results 2019 : काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर अशोक चव्हाण राजीनामा द्यायची शक्यता
Election results 2019 : काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर अशोक चव्हाण राजीनामा द्यायची शक्यता

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. राज्य....

अधिक वाचा

पुढे  

राहुल गांधींचा पराभव केल्यानंतर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया
राहुल गांधींचा पराभव केल्यानंतर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया

गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीत राहुल गांधी यांचा पराभ....

Read more