ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपसोबतच्या 'युती'चं कारण...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 20, 2019 01:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपसोबतच्या 'युती'चं कारण...

शहर : मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अखेर भाजपसोबत पुन्हा एकदा 'युती' करण्याचं कारण सांगून टाकलंय. यासाठी त्यांनी पाकिस्तानचा हवालाही दिलाय. 'शिवसेनेनं भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा एकदा नव्यानं युती केली कारण आपल्या पक्षाला एक असा पंतप्रधान हवाय ज्याच्याकडे पाकिस्तानवर हल्ला करण्याची हिंमत असेल' असं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 

आपण यापुढे कधीच भाजपासोबत हातमिळवणी करणार नाही, या आपल्याच घोषणेवर पलटी मारण्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं 'पाकिस्तानात घुसून हल्ला करणारा पंतप्रधान आम्हाला हवाय. त्यामुळेच आम्ही पुन्हा एकदा युती केलीय. मी मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी भाजपासोबत हातमिळवणी केलीय' असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानाचं कलम ३७० काँग्रेसला हटवायचं नाही. परंतु, जम्मू काश्मीरमध्ये इतर भारतात जे कायदे लागू आहेत तेच कायदे जम्मू-काश्मीरमध्येही लागू व्हावेत ही शिवसेनेची मागणी आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

'एमआयएम'वर टीका

चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी औरंगाबादेत शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी 'एमआयएम'वर कडाडून टीका केली. आपण मुस्लिमांना शत्रू मानत नसल्याचंही त्यांनी अधोरेखीत केलं.

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर सेनेच्या मंचावर

व्यासपीठावर शिवसेनेच्या नेत्यांसोबत बीडचे राष्ट्रवादीचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागरही होते. यावेळी बोलताना 'जयदत्त तुम्ही म्हणाल आता पाहुणा म्हणून आलो पण आता पाहुणे राहू नका, घरचे व्हा' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तर निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळ मागे पडल्याचंही त्यांनी मान्य केलं. 'दुष्काळात मदतीचा हाथ द्यायला पुढं या आणि तातडीनं काम सुरु करा' असा आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिला. या कामासाठी त्यांनी भाजपाकडेही मदतीची मागणी केलीय. 

मागे

...या मतदारसंघात ९० टक्के मतदान केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाही
...या मतदारसंघात ९० टक्के मतदान केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाही

श्रीनगर लोकसभा मतदार संघांत गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्या....

अधिक वाचा

पुढे  

भाजप उमेदवाराला ईव्हीएम फोडल्याच्या आरोपावरून अटक
भाजप उमेदवाराला ईव्हीएम फोडल्याच्या आरोपावरून अटक

ओडिशामधील भाजपच्या एका उमेदवाराला ईव्हीएम मशीन फोडल्याच्या आरोपावरून अटक....

Read more