ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'राज्यसभेत आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते; उपसभापतींबद्दलचा माझा अंदाज चुकला'

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'राज्यसभेत आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते; उपसभापतींबद्दलचा माझा अंदाज चुकला'

शहर : मुंबई

कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस चर्चा व्हायला पाहिजे होती. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या आग्रहामुळे ही विधेयके तातडीने मंजूर करण्यात आली. त्यासाठी सदनाचे कामकाज रेटण्याचा प्रयत्न झाला. आजवर राज्यसभेत असे कधीच घडले नव्हते, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी रविवारी राज्यसभेत कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी झालेल्या गोंधळासंदर्भात सविस्तरपणे भूमिका मांडली.त्यांनी म्हटले की, राज्यसभेतील विरोधी पक्षाचे खासदार उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांना वारंवार नियमाचे पुस्तक दाखवत होते. पण उपसभापतींनी त्याकडे दुर्लक्ष केले. खासदार नियमाचे पुस्तक दाखवत असताना उपसभापतींनी त्यांचे ऐकायला पाहिजे होते. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत उपसभापतींनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेतले.

उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्याकडून मला अपेक्षा होत्या. मात्र, त्यांचे वागणे बघून मला धक्का बसला. उपसभापतींकडून विचारांना तिलांजली देण्याचे काम झाले, अशी टीका शरद पवार यांनी केली. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या उपसभापतींनी सभागृहात नियमांना महत्त्व दिले नाही, ते निलंबित सदस्यांना चहापान द्यायला गेले. मात्र, सदस्यांनी त्यांच्या चहापानाला हात लावला नाही, याचा आपल्याला अभिमान असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्याविषयीचा आपला अंदाज सपशेल चुकल्याची कबुलीही शरद पवार यांनी दिली. तसेच निलंबित खासदारांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचेही शरद पवार यांनी जाहीर केले.

...म्हणून मी राज्यसभेत गेलो नव्हतो- शरद पवार

राज्यसभेत कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी आपण का हजर नव्हतो, याचे स्पष्टीकरणही शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत दिले. मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीबद्दल मी गेले दोन दिवस राज्य सरकारशी चर्चा करत आहे. मी अनेक कायदे तज्ज्ञांबरोबरही बोललो. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर अपील करणे गरजेचे आहे. त्यासाठी मला मुंबईत थांबावे लागले आणि दिल्लीला जाता आले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

 

मागे

चहा देऊनही निलंबित खासदार आंदोलनावर ठाम; आता उपसभापतीही करणार उपवास
चहा देऊनही निलंबित खासदार आंदोलनावर ठाम; आता उपसभापतीही करणार उपवास

संसदेच्या प्रांगणातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निलंबनाच्या कार....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाशी लढताना व्यूव्हरचनेत बदल करावा - डॉ. अमोल कोल्हे
कोरोनाशी लढताना व्यूव्हरचनेत बदल करावा - डॉ. अमोल कोल्हे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता करणार आहे. कोरोनाशी लढताना आपल्याला व्यू....

Read more