ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आमच्या सरकारने करोडो लोकांना नागरिकत्व दिलं आहे - अमित शाह

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 05:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आमच्या सरकारने करोडो लोकांना नागरिकत्व दिलं आहे - अमित शाह

शहर : देश

           नवी दिल्ली -  सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. सर्व विरोधी पक्ष देशातील लोकांची दिशाभूल करत आहे. कुणाचही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही. तशी कायद्यात तरतूदच केलेली नाही,” असं ते म्हणाले आहेत. 


          “काँग्रेस पक्ष नेहरू लियाकत कराराचा भाग होता. पण, व्होट बँकेच्या राजकारणामुळे त्यांनी गेली सत्तर वर्ष त्यांनी याची अंमलबजावणी केली नाही. आमच्या सरकारने तो करार लागू करून लाखो, करोडो लोकांना नागरिकत्व दिलं आहे,” असंही शाह यांनी सांगितलं.


           दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रविवारी आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांनी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात सोमवारी देशभरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये निषेध करण्यात आला.


           दरम्यान, या कायद्याविरोधात विद्यार्थी निदर्शनं करत असून, विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनंही यावरून सरकारवर टीका केली आहे. “तुम्ही आम्हाला नागरिक मानत नसाल, तर आम्ही तुम्हाला सरकार समजणार नाही. तुमच्याकडे संसदेमध्ये बहुमत आहे. पण, आमच्याकडे रस्त्यावरचे बहुमत आहे. ही लढाई हिंदू किंवा मुस्लिमांविषयी नाही. आम्हाला सावरकरांचा देश नकोय आम्हाला भगतसिंह आणि बाबासाहेब आंबेडकरांचा देश हवा आहे. त्यांची इच्छा आहे की अश्फाक आणि बिस्मिल यांनी भांडत राहावं पण, आम्ही तस घडू देणार नाही,” असं कन्हैया म्हणाला.

मागे

मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 23 किंवा 24 तारखेला
मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 23 किंवा 24 तारखेला

           मुंबई -  महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंब....

अधिक वाचा

पुढे  

पायल रोहतगीचा जामीन मंजूर
पायल रोहतगीचा जामीन मंजूर

            नवी दिल्ली - राजस्थानच्या बूंदी न्यायालयाने २४ डिसेंबर अभि....

Read more