ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदीपर्वाची नवी सुरुवात; महात्मा गांधी आणि अटलजींच्या समाधीचे घेतले दर्शन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 30, 2019 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदीपर्वाची नवी सुरुवात; महात्मा गांधी आणि अटलजींच्या समाधीचे घेतले दर्शन

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर गुरुवारी नरेंद्र मोदी दिल्लीत दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मोदींचा हा बहुचर्चित शपथविधी सोहळा पार पडेल. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात केली. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपाध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित होते. यानंतर मोदींनी राष्ट्रीय युद्धस्मारकालाही भेट दिली. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे आठ हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. पाकिस्तान वगळता बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड या बिमस्टेक देशांचे प्रमुखही सोहळ्याला उपस्थित असतील. शंभरहून अधिक अनिवासी भारतीय खास या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत दाखल होत आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर राष्ट्रपती भवनात निवडक पाहुण्यांसोबत पंतप्रधान मोदी यांचे रात्रीभोज आयोजित करण्यात आले आहे. या भोजनासाठी ४८ तासांहून अधिक वेळ लागणारा दाल रायसीना हा पदार्थ तयार करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील ( रालोआ) काही खासदारही मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मंत्रिमंडळाविषयी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात बुधवारी दीर्घकाळ चर्चा सुरु होती. त्यामुळे कृषी, ग्रामीण विकास, ऊर्जा, गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

मागे

महिनाभर कोणत्याही कार्यक्रमांत काँग्रेस प्रवक्ते चकार शब्द काढणार नाहीत कारण...
महिनाभर कोणत्याही कार्यक्रमांत काँग्रेस प्रवक्ते चकार शब्द काढणार नाहीत कारण...

पुढचा एक महिना टीव्ही वाहिन्यांवरील चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय ....

अधिक वाचा

पुढे  

जगनमोहन रेड्डींच्या शपथविधीवर अस्मानी संकट; कार्यक्रमस्थळ उद्ध्वस्त
जगनमोहन रेड्डींच्या शपथविधीवर अस्मानी संकट; कार्यक्रमस्थळ उद्ध्वस्त

आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामुळे पक्ष ....

Read more