ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आरोप सिद्ध न झाल्यास मोदी जनतेसमोर उठाबशा काढणार का? ममता बॅनर्जी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 03:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आरोप सिद्ध न झाल्यास मोदी जनतेसमोर उठाबशा काढणार का? ममता बॅनर्जी

शहर : calcutta

निवडणुकीचा फक्त एक टप्पा बाकी आहे. अशात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पश्चिम बंगाल पेटलं आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा फोडण्यात आला. हा प्रकार तृणमूलच्या गुंडांनी केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. तसेच आम्ही ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पंचधातुचा पुतळा उभारू अशीही घोषणा केली. या घोषणेला ममता बॅनर्जींनी आव्हान दिलं आहे. मोदी म्हणतात की ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पंचधातुचा पुतळा उभारण्याची घोषणा मोदींनी केली. मात्र जो 200 वर्षांपासूनचा वारसा होता तो मोदी परत करू शकतात का? असा प्रश्न ममता बॅनर्जींनी विचारल आहे.
गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शाब्दिक चकमक रंगताना दिसते आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना त्यांनी याआधीही मोदींनीही त्यांच्यावर निशाणा साधला. आता ममता बॅनर्जींनी मोदी यांना उदाहरण देऊन टीका केली आहे.
तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर मोदी पुतळा फोडल्याचा आरोप करत आहेत. हा आरोप सिद्ध झाला नाही तर मोदी जनतेसमोर उठाबशा काढणार का? त्यांनी उठाबशा काढल्या नाहीत तर मी त्यांना तुरुंगात धाडेन असाही इशारा ममता बॅनर्जींनी दिला. 200 वर्षांपासूनचा वारसा मोदी परत करू शकतात का? असेही ममता बॅनर्जींनी विचारले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटं बोलत आहेत असाही आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर तुम्ही आरोप केले आहेत ते ठीक आहे. आरोप सिद्ध करून दाखवा नाहीतर मी तुम्हाला तुरुंगात धाडेन असा इशाराही ममता बॅनर्जींनी दिला आहे.

मागे

हिटलरच्या वेषात ममता बॅनर्जींवर मीम
हिटलरच्या वेषात ममता बॅनर्जींवर मीम

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फेरफार केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाक....

अधिक वाचा

पुढे  

नथुराम गोडसे हा देशभक्त होता आणि राहील; प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा बरळल्या 
नथुराम गोडसे हा देशभक्त होता आणि राहील; प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा बरळल्या 

भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकद....

Read more