ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शरद पवारांनी मैदान गाजवलं पण ….

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 25, 2019 12:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शरद पवारांनी मैदान गाजवलं पण ….

शहर : मुंबई

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण त्याचवेळी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीनेही राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांचं या निवडणुकीत काय होणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला आणि उदयनराजेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी या निवडणुकीत मोठ्या फरकाने बाजी मारत सातारा हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलं.

सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय झाल्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला गड राखल्याचं बोललं जात आहे. मात्र हा गड राखताना पवारांना आपला सिंह गमवावा लागला. कारण साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक शशिकांत शिंदे यांचा विधानसभा निवणुकीत पराभव झाला आहे. कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला.

दरम्यान, सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव करत राष्ट्रवादी श्रीनिवास पाटील जाएंट किलर ठरले आहेत. उदयनराजे भोसले यांची लोकप्रियता पाहता त्यांचा पराभव कठीण मानला जात होता. मात्र उदयनराजेंचा पक्षांतराचा निर्णय लोकांना पसंत पडला नसल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'सातारा गादीबद्दल जनतेला आदर आहे. पण उदयनराजे भोसले यांनी गादीची प्रतिष्ठा राखली नाही. मी उद्या इतर दौरे रद्द करून साताऱ्याला जाऊन राष्ट्रवादीचे उमेदवार आणि जनतेचं आभार मानणार आहे,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

मागे

मातोश्रीवर ठरणार नव्या सरकारचं भवितव्य,शिवसेना किंग होणार की किंगमेकर?
मातोश्रीवर ठरणार नव्या सरकारचं भवितव्य,शिवसेना किंग होणार की किंगमेकर?

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला 220 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास य....

अधिक वाचा

पुढे  

कारागृहातून निवडणूक लढवूनही  बंडखोर उमेदवार विजयी
कारागृहातून निवडणूक लढवूनही बंडखोर उमेदवार विजयी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली तेव्हापास....

Read more