ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘मातोश्री’ची पत घसरली? उद्धव ठाकरे यांना अखेर राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, पण…

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 21, 2024 09:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘मातोश्री’ची पत घसरली? उद्धव ठाकरे यांना अखेर राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, पण…

शहर : मुंबई

मला राम मंदिर सोहळ्याची आवश्यकता नाही, मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणाची गरज नसते. पण मी त्या दिवशी अयोध्येला जाणार नाही. मी यापूर्वी अयोध्येला अनेकदा जाऊन आलो आहे. त्या दिवशी मी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहे. हे मंदिर ऐतिहासिक आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. असं असलं तरी उद्धव ठाकरे यांनाही अयोध्येच्या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

अयोध्येत उद्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. देशविदेशातील भाविकही या सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. देशातील हा सर्वोच्च सोहळा असणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील नेत्यांना आणि व्हीआयपींना निमंत्रण देण्यात आलं आहे. अनेकांना स्वत: भेटून निमंत्रण देण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पण उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

रामजन्मभूमी ट्रस्टने निवडणूक आयोगाकडून यादी घेऊन देशातील नोंदणीकृत पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना निमंत्रणे आली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पण उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष मातोश्रीवर जाऊन निमंत्रण देण्यात आलेलं नाही. उद्धव ठाकरे यांना स्पीड पोस्टने निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरारा कमी होतोय?

एकेकाळी मातोश्रीचा दरारा होता. भाजपचे बडे नेते मातोश्रीतच येऊन चर्चा करायचे. मातोश्रीतूनच सर्व राजकीय निर्णय व्हायचे. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर मातोश्रीकडे भाजपचे नेते यायचे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडताच मातोश्रीचा दरारा कमी होताना दिसतोय. आधी शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद कमी झाली. आता तर उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील सोहळ्याचं स्पीड पोस्टने निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरेंचा दरारा कमी झालाय का? अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, बाबरी पडली तेव्हा त्याची जबाबदारी घेणारं विधान बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. बाळासाहेबांनी नेहमीच अयोध्येतील राम मंदिराचं समर्थ केलं होतं, असं असतानाही उद्धव ठाकरे यांना स्पीड पोस्टने या सोहळ्याचं निमंत्रण दिलं गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राऊतांचा संताप

उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने निमंत्रण देण्यात आलं आहे, त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्यांचा राम जन्मभूमीशी काहीच संबंध नाही, अशा प्रसिद्ध लोकांना आणि बॉलिवूड सेलिब्रिटिंना तुम्ही विशेष निमंत्रण देत आहात. आणि राम मंदिराच्या आंदोलनात ज्या ठाकरे कुटुंबाने मोठं योगदान दिलं, त्या ठाकरे कुटुंबासोबत तुम्ही अशा पद्धतीने वागत आहात? तुमच्या या वागण्याला भगवान रामही कधीच माफ करणार नाही. भगवान राम तुम्हाला शाप देतील. तुम्ही भगवान रामाची प्रार्थना करता आणि रावणासारखं सरकार चालवता? असा सवाल संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मागे

मी विनंती करतो की… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनोज जरांगे यांना आवाहन काय?
मी विनंती करतो की… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनोज जरांगे यांना आवाहन काय?

जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवले पाहिजे. आंदोलनाचा जनतेला त्रास होत आहे. म....

अधिक वाचा

पुढे  

राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाही,उद्या मनोज जरांगेंच्या गुन्हेगारी संदर्भात;सदावर्ते यांचं मोठं विधान
राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाही,उद्या मनोज जरांगेंच्या गुन्हेगारी संदर्भात;सदावर्ते यांचं मोठं विधान

मनोज जरांगे पाटील सांगितल्याप्रमाणे मोठ्या संख्येने मराठा आरक्षणाच्या मा....

Read more