ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुनील गावस्कर का भडकले?

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 02:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुनील गावस्कर का भडकले?

शहर : मुंबई

भारताचे महान फलंदाज, टीम इंडियाचे माजी कर्णधार, लिटल मास्टर सुनील गावस्कर नेहमीच बीसीसीआयसह एकूण क्रिकेटविषयावर आपली मते परखडपणे मांडत असतात. काल बांगला देशचा पराभव केल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवे अध्यक्ष सौरभ गांगुलीचं भरभरून कौतुक केलं. त्यामुळे गावस्कर चांगलेच भडकले.

गांगुलीचे कौतुक करताना विराट कोहली म्हणाला की, सौरभ गांगुली कर्णधार असतांनाही भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. खरं तर दादाच्या संघाने याची सुरुवात केली आणि त्यांनी सुरू केलेली ही विजयी परंपरा आम्ही पुढे घेऊन जात आहोत.

दरम्यान कोहलीच्या या वक्तव्यावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर नाराज झाले. ते म्हणाले , असं अजिबात नाही टीम तेव्हाही जिंकत होती, जेव्हा कोहलीचा जन्मही झाला नव्हता. भारत १९७० आणि १९८० मध्येही जिंकत होता. अनेक लोकांच्या असाच गैरसमज आहे की, क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या विजयाची सुरुवात २००० पासून झाली. पण भारतीय संघाने परदेशात १९७० आणि १९८० च्या दशकातही मालिका जिंकली होती. मात्र बांगलादेशवर भारताने विजय मिळविताच ‘हा खरंच ऐतिहासिक विजय आहे. अशी प्रतिक्रिया गावस्कर यांनी दिली होती. त्यानंतर भारतीय संघाच्या कर्णधार म्हणाला की, या गोष्टीला २००० मध्ये सुरुवात झाली होती. जेव्हा गांगुली कर्णधार होते. मला माहीत आहे की, सध्या दादा बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कदाचित कोहली त्यांच्याबाबत एवढ चांगलं बोलत असेल, असंही गावस्कर म्हणाले.

मागे

विराटला मोठा दणका; मॅच फिक्सिंग प्रकरणी क्राईम ब्रॅंच करणार चौकशी
विराटला मोठा दणका; मॅच फिक्सिंग प्रकरणी क्राईम ब्रॅंच करणार चौकशी

भारतीय क्रिकेटमध्ये विविध प्रीमिअर लीगचे आयोजन केले जाते. दरम्यान सध्या कर....

अधिक वाचा

पुढे  

धोनीच्या भविष्याबाबत प्रशिक्षक रवी शास्त्रींचं महत्त्वाचं वक्तव्य
धोनीच्या भविष्याबाबत प्रशिक्षक रवी शास्त्रींचं महत्त्वाचं वक्तव्य

टीम इंडियाने बांगलादेशला टेस्ट सीरिजमध्ये २-०ने मात दिली. या सीरिजची शेवटच....

Read more