ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मेगा भरती भाजपला भोवल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 12:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मेगा भरती भाजपला भोवल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा 

शहर : मुंबई

         मुंबई - मेगा भरती भाजपला भोवल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील भाजप मेळाव्यात केला. या विधानानंतर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवरच बोट ठेवल्याचं बोललं जातं आहे.  मेगाभरती ही भाजपची सर्वात मोठी चूक असून यामुळे भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का बसल्याचं चंद्रकांत पाटील या मेळाव्यात म्हणाले.


          भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार पाडून या पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. या बाहेरील नेत्यांचे स्वागत करताना यावेळी पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये उत्साह होता. याचे कारण म्हणजे आता विरोधी पक्ष संपणारच असे चित्र त्यावेळी निर्माण झाले होते आणि दुसरे म्हणजे आता काँग्रेस, राष्ट्रवादीतील हे दिग्गज नेते आल्याने पक्ष जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास या नेत्यांना होता. 


         पण या मेगाभरतीमुळे त्याचवेळी पक्षातील काही जण नाराज होते. या मेगाभरतीमुळे ज्यांची संधी हिरावली गेली किंवा ज्यांना ही मेगाभरती पटत नव्हती ते नेते नाराजी व्यक्त करीत होते. पण उघडपणे कुणीही बोलायला तयार नव्हते. आता ही नाराजी भाजपा सत्तेपासून दूर राहिल्यामुळे समोर येत असल्याचे म्हणावे लागेल. तेव्हा मेगाभरतीचे सर्व निर्णय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतले होते. पण आता मेगाभरती चूकच असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या तेव्हाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह लावल्याचे बोलले जात आहे.


        चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याने मेगाभरतीद्वारे भाजपमध्ये आलेले निश्चितच नाराज होणार आहेत. पण त्यांची नाराजी वाढून पक्षाची डोकेदुखी आणखी वाढू नये याची काळजी पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रकांत पाटील काय बोलले याची माहिती नसल्याचे प्रतिपादन केले आहे. पण राजकीय पक्ष वाढीसाठी मेगाभरती आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. पण ती करताना जुन्यांचा अपमान आणि नव्यांचा सन्मान होऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपच्या देशभक्ती धोरणाला-समाजहित नीतीला धरून नवी भरती असली तरी पक्षाला बळकटी मिळते, पक्ष खाजगी मालमत्ता होऊ नये, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.


     भाजप विरोधकांच्या हाती चंद्रकात पाटील यांच्या कबुलीमुळे आयतेच कोलीत मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी विरोधकांनी आता भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. चूक लक्षात आली आहे तर मेगाभरती केलेल्या सगळ्यांची हकालपट्टी करा, असा थेट टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. कारण मेगाभरतीत सगळ्यात जास्त राष्ट्रवादी पक्ष फुटला होता.
 

मागे

माहिम ते माटुंगा दरम्यान रेल्वे रुळांना तडा: चकरमान्यांचे हाल
माहिम ते माटुंगा दरम्यान रेल्वे रुळांना तडा: चकरमान्यांचे हाल

       मुंबई : पश्चिम रेल्वेच्या माहिम आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रेल....

अधिक वाचा

पुढे  

साई जन्मभूमी वादात शिर्डी बंद
साई जन्मभूमी वादात शिर्डी बंद

         शिर्डी : साईबाबा यांच्या जन्मस्थळ असलेल्या पाथरी गावाचा वि....

Read more