ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकांनी घरीच राहावे, ७२ लाख लोकांना मोफत ७.५ किलो रेशन - केजरीवाल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 08:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकांनी घरीच राहावे, ७२ लाख लोकांना मोफत ७.५ किलो रेशन - केजरीवाल

शहर : देश

कोरोना व्हायरसच्या (coronavirus)वाढत्या धोका लक्षात घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (  Arvind Kejriwal) यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये. त्यांनी घरीच राहावे, असे आवाहन केले आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी दिल्लीत ५० टक्के बस धावणार आहे. दिल्लीकरांनी घरीच रहावे, बाहेर जाऊ नये. तसेच ७२ लाख लोकांना ७.५ किलो धान्य मिळेल, अशी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोरोनाच्या भीतीमुळे दिल्लीत रेशनचा कोटा वाढविला आहे आणि ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत ७२ लाख लोकांना दरमहा ७.५ किलो रेशन मोफत देण्यात येणार आहे. रात्रीच्या निवारामध्ये मोफत भोजन दिले जाईल, असेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, रेशन दुकानांवर गर्दी करु नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

सध्या दिल्लीत बंदची कोणतही परिस्थिती नाही, परंतु गरज पडल्यास आम्ही दिल्लीमध्ये लॉकडाउन करु शकतो, असा इशारा दिला आहे. या व्यतिरिक्त दिल्लीतील वृद्ध, विधवा आणि अपंगांना पेन्शन दुप्पट देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. ज्येष्ठांनी घरे सोडू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असेही ते म्हणाले.

                        

 

मागे

रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा - आरोग्यमंत्री राजेश टोपे
रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा - आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यात ६४ ....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाशी युद्धास भारत सज्ज : ७ ते ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू
कोरोनाशी युद्धास भारत सज्ज : ७ ते ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू

कोरोना वायरशी लढण्यासाठी जनतेद्वारा कर्फ्यू लावण्याची देशाच्या इतिहासात ....

Read more