ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये काय बदलणार?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 05, 2019 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये काय बदलणार?

शहर : देश

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबाबत मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्यसभेमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरबाबत ५ महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये

१ काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० अंशतः हटवण्याचा प्रस्ताव मांडला.

२ यासोबतच अनुच्छेद ३५ अ देखील हटवण्यात आलं.

३ जम्मू काश्मीरचं केंद्र सरकारने द्विभाजन केलं.

४ जम्मू काश्मीर ही आता विधानसभेसह केंद्रशासीत प्रदेश असेल.

५ लडाख हा प्रदेश विधानसभेशिवाय केंद्रशासीत प्रदेश गणला जाईल.

काय होतं अनुच्छेद ३७०?

१ जम्मू-काश्मीरच्या विधानसभेला त्यांच्या सोयीनुसार हित आणि कायदे निश्चित करण्याचा अधिकार

२ इतर राज्यातील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही

३ संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळण संबंधित कायदा बनवण्याचा अधिकार

४ अनुच्छेद ३७० मुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला.

५ या अनुच्छेदामुळे जम्मू-काश्मीरमध्ये माहिती आणि शिक्षण अधिकाराचे कायदे लागू करता येत नाही.

६ जम्मू-काश्मीरमधील अल्पसंख्याकांच्या विकासासाठी केंद्र सरकार काहीच करू शकत नाही.

७ भारतातला कोणताही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकता घेऊ शकत नाही, पण जम्मू-काश्मीरचा नागरिक भारतात नागरिकता घेऊ शकतो.

८ भारतीय संसद जम्मू-काश्मीर विधानसभा भंग करू शकत नाही

९ जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो, तर देशाच्या इतर राज्यात हा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.

१० जम्मू-काश्मीरची कोणत्याही महिलेनं जर भारताच्या इतर राज्यातल्या नागरिकाशी विवाह केला, तर तिचं नागरिकत्व संपुष्टात यायचं, तर तिने पाकिस्तानच्या व्यक्तीशी लग्न केलं तर त्यालाही जम्मू-काश्मीरचनं नागरिकत्व मिळायचं.

११ अनुच्छेद ३७० मुळे काश्मीरमध्ये राहणाऱ्या राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनाही भारतीय नागरिकत्व मिळत होतं.

अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे आता

१ काश्मीरसाठीचा वेगळा झेंडा संपुष्टात येईल.

२ काश्मीरमध्ये मालमत्ता विकत घेणं भारतीयांना शक्य होईल.

३ काश्मिरींचे दुहेरी नागरिकत्व संपुष्टात येईल.

४ काश्मीरबाबतचा निर्णय संसदेत होणार

५ केंद्राच्या कायद्यासाठी आधी काश्मीरच्या विधानसभेची संमती लागायची, पण अशा संमतीची आता गरज नाही.

६ जम्मू-काश्मीरला मिळालेली स्वायत्तता संपुष्टात येणार.

७ जम्मू-काश्मीरसाठीची वेगळी राज्यघटना संपुष्टात येणार.

८ काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात येणार.

९ जम्मू काश्मीरच्या विधानसभेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असेल

अनुच्छेद ३५ ए काय होतं?

  • अनुच्छेद ३५ ए नुसार जम्मू-काश्मीर विधानसभा नागरिकत्वाची परिभाषा ठरवू शकते.
  • संविधानात जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा
  • १९५४ साली राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आदेशानुसार अनुच्छेद ३५ ए संविधानात जोडलं गेलं.
  • जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरची लोकं संपत्ती विकत घेऊ शकत नाहीत.
  • बाहेरची लोकं जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी करु शकत नाहीत.

मागे

पोलीस अधिकाऱ्याने लाठ्या घ्या रे म्हणताच; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय
पोलीस अधिकाऱ्याने लाठ्या घ्या रे म्हणताच; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय

नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसाने गोदावरी नदीला पूर आला आहे. त्....

अधिक वाचा

पुढे  

जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीरच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकारने सोमवारी ऐतिहासिक निर्णय घेत....

Read more