ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

3 हजार वाघांच्या सरंक्षणासाठी भारत कटिबद्ध : नरेंद्र मोदी

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 12:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

3 हजार वाघांच्या सरंक्षणासाठी भारत कटिबद्ध : नरेंद्र मोदी

शहर : delhi

भारतात सध्या 3 हजार वाघ आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे. त्यामुळे वाघांसाठी भारत हा जगातील सुरक्षित अधिवासांसाठी एक स्थळ असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

आजच्या जागतिक व्याघ्रदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना नरेद्र मोदी बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, 9 वर्षापूर्वी अमेरिकेच्या सेंट पिटर्सबर्ग येथे 2022 पर्यत भारतातील वाघांची संख्या दुप्पट करण्याची शपथ घेण्यात आली होती. भारताने हे लक्ष चार वर्ष आधीच साध्य केले आहे. भारतातील व्याघ्र संवर्धन मोहिमेची. 'एक था टायगर' पासून सुरू झालेली कहाणी 'टायगर जिंदा है' पर्यंत पोहोचली. हा प्रवास एवढ्यावरच थांबणार नाही. यंदा जाहीर झालेले व्याघ्रगणनेचे आकडे सुखावणारे आहेत. व्याघ्रगणना अहवालातील माहिती नुसार 2010 मध्ये भारतात 1706 वाघ होते.  2014 मध्ये वाघांच्या संख्येत वाढ होऊन ती 2226 इतकी झाली. तर 2018 माहे वाघांच्या संख्येत 741 ने वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात आजच्या घडीला 230-240 वाघ आहेत. मात्र चिंतेची बाब म्हणजे वाघांची संख्या वाढली तरी त्यांच्या मृत्युचे प्रमाणही वाढले आहे.

 

 

मागे

शहिदांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्च सिद्धिविनायक न्यास उचलणार
शहिदांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्च सिद्धिविनायक न्यास उचलणार

शहीद जवानांच्या मुलांचा के. जी टू पी.जी असा खर्च न्यासातर्फे उचलण्याचा निर्....

अधिक वाचा

पुढे  

सिसिडीच्या मालकाचा मृतदेह नेत्रावती नदीत
सिसिडीच्या मालकाचा मृतदेह नेत्रावती नदीत

'कॅफे कॉफी डे' चे मालक व्ही.जी.सिद्धार्थ यांचा मृतदेह 36 तासानंतर नेत्रावत....

Read more