ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राम मंदिर : शिवसेनेने ओवेसी यांना खडसावले, आता रडणे बंद करा!

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2020 12:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राम मंदिर : शिवसेनेने ओवेसी यांना खडसावले, आता रडणे बंद करा!

शहर : मुंबई

अयोध्ये राम मंदिर उभे राहत आहे. राम मंदिर हे संविधानेचे राष्ट्रीय प्रतिक असून लोकभावनेचा हा विजय आहे. त्यामुळे एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी यावरुन राजकारण करणे थांबवावे. तसेच याबाबतचे आता रडणे बंद करावे, असा असे शिवसेनेने त्यांना खडसावले आहे. शिवसेनेचे मुखमत्र दैनिक 'सामना'तून ओवसींवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावर असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली होती. त्यावरुन शिवसेनेने निशाणा साधला आहे. अयोध्येत 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भावनिक झाले. मिस्टर पंतप्रधान, मीसुद्धा तितकाच भावनिक झालो आहे. कारण मी एकात्मतेवर विश्वास ठेवतो. मी भावनिक झालो, कारण त्या ठिकाणी ४५० वर्षे एक मशीद उभी होती, असे ओवेसी यांनी म्हटले. हे ओवेसी यांचे ढोंगच आहे. कारण पाच हजार वर्षांपासून तेथे एक राममंदिर होते. ते तोफा लावून पाडले गेले तेथे मशीद उभी केली गेली! त्यामुळे नक्की कोणी भावनिक व्हायचे? जे पाप तोफांनी उभे केले ते पाप शिवसैनिकांनी हातोड्यांनी उद्ध्वस्त केले. लोकभावनेचा हा विजयच आहे! मिस्टर ओवेसी, आता रडणे वगैरे बंद करा, असे शिवसेनेने म्हटले आहे.

अग्रलेखात काय म्हटलेय ?

राम मंदिराबाबतचा निर्णय  सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तो निर्णय देशातील मुसलमानांनी स्वीकारला आहे. ओवेसी म्हणतात, ‘बाबर जिवंत आहे.’ आम्ही विचारतो, ‘कोण हा बाबर? हा बाबर तुमचा कोण लागतो?’ आता तर बाबरीचे नामोनिशाणही मिटले आणि भूमिपूजन सोहळ्यामुळे अयोध्येतील सुतकही गेले. बाबर आता भारतातच काय, तर जगात कोठेच जिवंत नाही. ज्या उझबेकिस्तान नामक प्रांतातून तो आला त्या देशात तरी तो किती जिवंत आहे याचे भान ओवेसी यांच्या सारख्या उच्चशिक्षित पुढाऱ्यांनी ठेवले पाहिजे.

हिंदुंवर मोगलांनी आक्रमण केले. त्यांचे स्वामित्व काही काळ लयास गेले, पण म्हणून हिंदुंचे अस्तित्वच संपले असे होत नाही. बाबराने रामजन्मभूमीचा विध्वंस केला तेथे मशीद उभारली हे ओवेसी यांच्यासारखे नेते का स्वीकारीत नाहीत, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. ओवेसी म्हणतात, ‘भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे राममंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहून मोदींनी संवैधानिक शपथ मोडली आहे. आजचा दिवस म्हणजे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेची हार असून हिंदुत्वाचा विजय आहे!’ ओवेसी यांच्या बोलण्यात तथ्य नाही, असे सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.

मुळात स्वतः ओवेसी तरी खरे निधर्मी आहेत काय याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. अयोध्येतील भूमिपूजन हा हिंदुत्वाचा विजय असल्याचे शल्य ओवेसी यांनी बोलून दाखवले. आम्ही सांगतो, हा न्याय आणि सत्य यांचा विजय आहे. कायदेशीर मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून तो मिळवला आहे. मोदी यांनी अयोध्येत केलेले मंदिराचे भूमिपूजन असंवैधानिक आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. ओवेसी, कोणत्या संविधानाच्या गोष्टी आपण करीत आहात? देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराबाबत निर्णय दिला. म्हणजे संविधानाचा आदर ठेवूनच अयोध्येत पंतप्रधानांनी भूमिपूजन केले आहे. हिंदुत्व हे सगळ्यात जास्त निधर्मी आहे. कारण ते देशाचे संविधान न्यायालयाचा आदर करते.

 

मागे

Googleचा चीनला झटका, २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स केले डिलीट
Googleचा चीनला झटका, २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स केले डिलीट

चीन विरोधात भारताने आक्रमकपणा घेतल्यानंतर अमेरिकाही अधिक आक्रम झाली आहे. भ....

अधिक वाचा

पुढे  

'मला नाही चौकशीलाच क्वारंटाईन केलं', पटण्याला परतताना एसपी विनय तिवारींचा आरोप
'मला नाही चौकशीलाच क्वारंटाईन केलं', पटण्याला परतताना एसपी विनय तिवारींचा आरोप

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे....

Read more