ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशभरात वाहतुकीचे नवीन नियम होणार कार्यरत

By SEJAL PURWAR | प्रकाशित: ऑगस्ट 31, 2019 02:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशभरात वाहतुकीचे नवीन नियम होणार कार्यरत

शहर : मुंबई

 बर्‍याच दिवसांपासून वाहतुकीचे नवीन नियम व दंड आकारण्याचे कायदे निर्माण झालेले होते. परंतु आता येत्या 1 सप्टेंबरपासून देशभरात वाहतुकीचे नवीन नियम सुरू करण्यात येणार आहेत. याचबरोबर नियम तोडल्यास मोठी रक्कम दंड म्हणून आकारली जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. हे नियम येत्या सोमवारपासून लागू होण्याचे समजत आहे.

नियम तोडण्याचा किमान दंड 500 रुपयांपासुन असून कमाल दंड 25000 रुपयांपर्यंत असणार आहे, याबरोबरच 3 वर्ष तुरुंगवास देखील होऊ शकतो. अल्पवयीन मुलामुलींनी कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा पालक व वाहन मालक या दोघांनादेखील भोगावी लागणार. वाहन चालवताना परवाना नसल्यास 500 रुपये दंड स्वीकारला जात होता परंतु आता कायद्यानुसार 5000 रुपये दंड आकारला जाणार असल्याचे समोर येत आहे. याबरोबरच वाहन वेगाची मर्यादा ओलांडल्यास 2000 रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. वाहनावर 2 पेक्षा अधिक व्यक्ती असल्यावर देखील 2000 रूपयांचा दंड आकारला जाणार.

हेल्मेट सक्तीबरोबरच वाहन वेग, वाहन परवाना, वाहनाची कागदपत्रे व वाहन चालकासंबंधित असलेल्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास आतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो. वाहन नियमांचे उल्लंघन करणे आता महागात पडणार असल्याचे समोर येत आहे.  

मागे

राम जन्मभुमी केस: हिंदूंची सुनावणी झाली पूर्ण, लवकरच येणार निर्णय
राम जन्मभुमी केस: हिंदूंची सुनावणी झाली पूर्ण, लवकरच येणार निर्णय

गेल्या 70 वर्षांपासून चालू असलेल्या वादाला कुठेतरी शांतता प्राप्त होण्याची....

अधिक वाचा

पुढे  

गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ
गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ

मुंबईसह राज्यात गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. मुंबईत काल रात्री ....

Read more