ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'सामना'ची जबाबदारी संजय राऊतांकडे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 10:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'सामना'ची जबाबदारी संजय राऊतांकडे

शहर : मुंबई

आजचा 'सामना' विशेष आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे 'सामना'चे संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडले आहे. 'सामना'ची जबाबदारी कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊतांकडे सोपवण्यात आलीय. त्यामुळे आजचा 'सामना' प्रथमच ठाकरेविरहीत 'सामना' आहे. वृत्तपत्र नियमन कायद्यानुसार वृत्तपत्रातील मजकूराची जबाबदारी संपादकाची असते. त्यानुसार प्रत्येक वृत्तपत्राला आपल्या संपादकाचे नाव वृत्तपत्रात छापणे बंधनकारक आहे.

कालपर्यंत 'सामना'च्या मजकूराची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर होती. आज मात्र सामनाच्या वृत्तपत्र नियमन कायद्यानुसार ही जबाबदारी आता संजय राऊत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवसेनाप्रणीत महाविकासआघाडीचे सरकार आज स्थापन होत आहे. त्यामुळे 'सामना'ने महाराष्ट्र धर्माचे सरकार असे या सरकारचे वर्णन केले. पण त्याचवेळी भाजपलाही जोरदार टोले दिलेत.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकासआघाडीच्यावतीने उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क म्हणजेच असंख्य शिवसैनिकांसाठी शिवतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी सायंकाळी हा शपथविधी सोहळा होत आहे.

शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे विविध मान्यवरांची, राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती पाहायला मिळेल. खुद्द ठाकरे कुटुंबीयांनी या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने निमंत्रणासाठी पुढे सरसावत आप्तजनांना अगत्याने बोलावले असल्यामुळे या शपथविधी सोहळ्यासाठी येणाऱ्यांकडेही अनेकांचं लक्ष असेल. गुरुवारी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रविकासआघाडीला डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मागे

भारतात आर्थिक मंदी नाही, कधी येणारही नाही- निर्मला सीतारामन
भारतात आर्थिक मंदी नाही, कधी येणारही नाही- निर्मला सीतारामन

भारतीय अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी आर्थिक मंदीची कोणतीही चिन्हे न....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनाप्रमुख यांचे मित्र म्हणतात, उद्धव हे कृष्ण, मी त्याचा सुदामा आहे
शिवसेनाप्रमुख यांचे मित्र म्हणतात, उद्धव हे कृष्ण, मी त्याचा सुदामा आहे

कृष्ण आणि सुदामा.. मैत्रीचं हळूवार नातं जपणारी दोन नावं.... सुदामाच्या भाबड्य....

Read more