ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर पुन्हा पलटवार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 06:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर पुन्हा पलटवार

शहर : मुंबई

            मुंबई - अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तुम्ही इतरांना मारझोड करून नेतृत्व करू शकत नाही. तो हल्ला असतो, नेतृत्व नव्हे, अशी बोचरी टीका अमृता फडणवीस यांनी केली. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे!, असा शेरही त्यांनी या ट्विटमध्ये जोडला आहे.


           अमृता फडणवीस यांनी रविवारी केलेल्या ट्विटमुळे या वादाला तोंड फुटले होते. केवळ ठाकरे आडनाव असून भागत नाही. त्यासाठी व्यक्तीला तत्वांचे प्रामाणिकपणे पालन आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करावे लागते, असे त्यांनी म्हटले. अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर शिवसेनेतील नेते आक्रमक झाले होते. 


           शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. उद्या शिवेसनेची महिला आघाडी आक्रमक झाली तर मग देवेंद्र फडणवीसांनी मध्ये यायचे नाही. महाराष्ट्राला अमृता फडणवीस नाव हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर कळले. त्यापूर्वी अमृता फडणवीस यांच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती.

 

           याउलट ठाकरे घराण्यातील चार पिढ्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांनी आधी स्वत:चे घर सांभाळावे आणि मग आम्हाला सांगावे, असे शिवसेना नेत्या विशाखा राऊत यांनी म्हटले होते. या सगळ्या वादाविषयी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही फार बोलण्यास नकार दिला होता. अमृता फडणवीस या स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत, एवढेच त्यांनी सांगितले होते.
 

मागे

अटल जल योजनेसाठी केंद्र सरकारची ६००० कोटी रुपयांना मंजुरी
अटल जल योजनेसाठी केंद्र सरकारची ६००० कोटी रुपयांना मंजुरी

            नवी दिल्ली - शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरक....

अधिक वाचा

पुढे  

CAA मुळे  प्रत्येत भारतीयाला आनंद झाला पाहिजे - संभाजी बिडे
CAA मुळे प्रत्येत भारतीयाला आनंद झाला पाहिजे - संभाजी बिडे

            राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे असं ....

Read more