ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मी राज्यपालांकडे सोपवतोय- देवेंद्र फडणवीस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 04:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मी राज्यपालांकडे सोपवतोय- देवेंद्र फडणवीस

शहर : मुंबई

देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आपण राज्यपालांकडे सोपवणार असल्याचं सांगितलं आहे. सत्तास्थापन होत नव्हती, सत्तास्थापन व्हावी यासाठी सहकार्य करण्यासाठी अजित पवार आमच्याबरोबर आले होते. पण त्यांनी आम्हाला सांगितलं काही कारणांमुळे यापुढे मी तुम्हाला सोबत करू शकत नाही, मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतोयानंतर सत्ता स्थापनेसाठी जेवढे आकडे पाहिजे, बहुमतासाठी जेवढे आकडे पाहिजेत तेवढे एकटे भाजपाकडे नाहीत, म्हणून  आम्ही म्हणजे मी देखील माझा राजीनामा राज्यपालांकडे सोपवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आम्ही जागृत विरोधी पक्षाचा आवाज जरूर होवू, एक जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

तसेच जनतेने हा कौल दिला आहे, तो फक्त भाजपाला दिला आहे, असं म्हणता येईल, कारण आम्ही जेवढ्या जागा लढवल्या, त्यात 67 टक्के जागांवर विजय मिळवला आणि शिवसेनेने जेवढ्या जागा लढवल्या, त्यात फक्त 44 ठिकाणी विजय मिळवला.

तसेच यापुढे जे सरकार स्थापन करणार आहेत, त्यांना शुभेच्छा. पण याठिकाणी सांगू इच्छितो हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आपल्या खालीच दबल जाईल. कारण आहे याची मतभिन्नता, ही फार काळ टिकेल असं वाटत नसल्याचंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री यापुढे म्हणाले, शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांचा एकच उद्देश होता, एकत्र येऊन भाजपाला दूर ठेवणे, जरी त्यांना जनमताचा कौल नव्हता.तसेच कशाप्रकारे का असेना आमच्यासोबत जे होते, असं सांगत शिवसेनेचं नाव घेता मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे आभार मानले.

तसेच शिवसेनेशी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची कोणतीही बोलणी झाली नव्हती. तरी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागण्याच्या मुद्यावर शिवसेना अडून बसली आणि विरोधी पक्षासोबत गेली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

 

मागे

सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपदाचा विक्रम फडणवीसांच्या नावावर
सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपदाचा विक्रम फडणवीसांच्या नावावर

भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवारांनी पहिल्यांदाच वापरलं 'हे' अस्त्र आणि तिथेच खेळ पालटला!
शरद पवारांनी पहिल्यांदाच वापरलं 'हे' अस्त्र आणि तिथेच खेळ पालटला!

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी उलथापालथ झाली. दोन दिवसांच्या रा....

Read more