ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये भाजपसाठी गेमचेंजर बनले राज्यपाल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 24, 2019 08:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये भाजपसाठी गेमचेंजर बनले राज्यपाल

शहर : देश

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाने सरकारस्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर 22 आणि 23 नोव्हेंबरला वेगाने राजकीय घडामोडी घडल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर राज्यपालांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले जातायत.मागच्या 3 वर्षांत 5 राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यपालांवर भाजपबद्दल पक्षपाती करण्याचे आरोप झाले. कोणकोणत्या राज्यांत भाजपने बहुमत नसताना सरकार बनवलं ते पाहूया.

महाराष्ट्र -: 22 नोव्हेंबर 2019 पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाआघाडीची चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वसहमतीने मुख्यमंत्रिपदासाठी ठरलं होतं. पण 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतली. रात्री साडेबारा वाजता मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या राज्यपालांनी त्यांचा दौरा रद्द केला, राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि मग शपथविधी झाला.

कर्नाटक -: 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनी सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं पण भाजपचं सरकार विधानसभेत बहुमत चाचणी यशस्वी करू शकलं नाही. त्यामुळे बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. यानंतर काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीचं सरकार आलं. पण 17 आमदारांनी समर्थन द्यायला नकार दिला. या सगळ्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं. या प्रकरणात राज्यपालांवर पक्षपातीपणाचे आरोप झाले.

मेघालय -: 2018 मध्ये मेघालयच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे 21 जागा होत्या पण राज्यपालांनी सरकार बनवण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमा बोलवलं. भाजपकडे फक्त 2 जागा होत्या आणि त्यांच्याशी युती करणाऱ्या नॅशनल पीपल्स पार्टीकडे 19 जागा होत्या.

गोवा -: 2017 मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीनंतर 40 सदस्यांच्या विधानसभेत 18 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष होता. पण राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी भाजप सरकारला सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं. काँग्रेसने याविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि पर्रिकरांचा शपथविधी थांबवण्याची मागणी केली. पण कोर्टाने शपथविधी न रोखता मनोहर पर्रिकर यांना विश्वासदर्शक ठरावाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. यामुळेही राज्यपालांच्या भूमिकेवर शंका निर्माण झाली.

मणिपूर -: 2017 मध्ये 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत काँग्रेसचे 28 आमदार जिंकले. भाजपकडे 21 आमदार होते पण राज्यपालांनी निवडणुकीनंतर झालेल्या युतीच्या आधारे भाजपला सरकार बनवण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर भाजपचं सरकार आलं.

 

मागे

मनसे पुन्हा मैदानात उतरण्यास तयार? निवडणुकीबाबत केली मागणी
मनसे पुन्हा मैदानात उतरण्यास तयार? निवडणुकीबाबत केली मागणी

महाराष्ट्राच्या राजकारणात 23 नोव्हेंबरला मोठी उलथापालथ झाली. शनिवारी पहाटे....

अधिक वाचा

पुढे  

‘मोदी-शाहांसह कुटुंबातील गद्दारांविरोधातही लढत आहेत शरद पवार’, सुप्रिया सुळेंचा घणाघात
‘मोदी-शाहांसह कुटुंबातील गद्दारांविरोधातही लढत आहेत शरद पवार’, सुप्रिया सुळेंचा घणाघात

महाराष्ट्राच्या राजकारणात सेकंदात घडामोडींना नवे वळण येत आहे. यात खासदार स....

Read more