ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक यांची मागणी

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 06:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक यांची मागणी

शहर : देश

मुंबईतील लोकल सुरू करण्यासाठी मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केलेलं असतानाच आता भाजपने हा मुद्दा संसदेतही उपस्थित सुरू केला आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी आज संसदेत केली आहे.

संपूर्ण देशात अनलॉक- ची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईत हजारो लोक लोकलनेच प्रवास करतात. जूनमध्ये मुंबईची लोकल सुरू झाली आहे. पण सरकारी कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हजारो मुंबईकरांची कोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबईची लोकल सेवा पूर्ववत करून संपूर्ण मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी. जेणेकरून कामावर जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी मागणी मनोज कोटक यांनी लोकसभेत केली.यावेळी कोटक यांनी त्यांच्या मतदारसंघातील भांडूप आणि विक्रोळी मतदारसंघाकडेही सभागृहाचं लक्ष वेधलं. विक्रोळी आणि भांडूपमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी राहतात. मात्र या दोन्ही स्थानकांवर लोकल थांबत नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत कार्यरत असूनही येथील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करता येत नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांना बसेस किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून त्याचा खर्च या कर्मचाऱ्यांना परवडेनासा झाला आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांवर लोकल थांबविण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईतील लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या असून खासगी आणि सहकारी बँकातील कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच सामान्य मुंबईकरांना लोकलमधून प्रवास मिळावा म्हणून मनसेने लोकलमधून विना तिकिट प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केलं होतं. यावेळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बसमधील गर्दीचा एक व्हिडिओ ट्विट करून लोकलमधील गर्दीमुळे करोना होतो, मग बसमधील गर्दीमुळे करोना होत नाही का?, असा सवाल देशपांडे यांनी केला होता. मनसेपाठोपाठ आता भाजपनेही मुंबईच्या लोकलचा मुद्दा हाती घेतल्याने राज्यसरकार त्यावर काय निर्णय घेते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मागे

लोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या 'गोंधळा'वर निलेश राणेंचा निशाणा
लोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या 'गोंधळा'वर निलेश राणेंचा निशाणा

कृषी विधेयकावर शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेतल्या दुटप्पी भूमिकेवर भाज....

अधिक वाचा

पुढे  

बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?
बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आह....

Read more