ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष- शरद पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 04:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष- शरद पवार

शहर : पुणे

आपल्या देशात शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला जात नाही. शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. बारामती मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा निरा गावात झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. मी सध्या निवडणूक लढवत नाही. मी वरच्या म्हणजे राज्यसभेत आहे. खालच्या सभागृहाच्या म्हणजे लोकसभेच्या भानगडीत आपण पडायचं नाही असं मी ठरवल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी अकलूजमध्ये आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार फक्त साखर धंद्यात जास्त लक्ष देतात अशी टिका केली होती. याला पवारांनी उत्तर दिले आहेगेल्या ५० वर्षांत मी कुठल्या कारखान्याचा साधा संचालकही नाही. तरीदेखील माझा श्वास चालेपर्यंत मी या शेतकऱ्यांसाठी झटणार असे त्यांनी म्हटले आहेमाझा पुतण्या सगळं बघायला लागलाय, माझ्या हातातील सत्ता गेली अशी टिका पंतप्रधान करतात. यात काय गैर आहे? मला त्यात आनंदच आहे. त्यांना मुलं ना बाळं त्यांना काय कळणार ? देशातील महत्वाच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी ते आमच्या कुटुंबावर टिका करत असल्याचे पवार म्हणाले.

अमित शहांचं बारामतीत स्वागत असून आम्ही त्यांना मोकळ्या हातांनी पाठवणारच आहोत. आम्ही त्यांचा उत्तम पाहुणचार करूशाह गुजराती आहेत, त्यांना व्यवहार चांगला कळतो. त्यामुळे ते काहीतरी मुद्दा उपस्थित करतील पण आम्ही आमचा मुद्दा सोडणार नाही असे पवार म्हणाले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता कारखानदारांचे कर्ज माफ करू असे शाह म्हणातात. त्यांची निती काय आहे ते यावरून कळत असल्याचेही पवार म्हणाले.

मागे

पहिले अवयव दान केलेल्या  युवकाच्या  आईने  मतदानावर बहिष्कार टाकत  केले उपोषण
पहिले अवयव दान केलेल्या युवकाच्या आईने मतदानावर बहिष्कार टाकत केले उपोषण

लातूर जिल्ह्यामध्ये २०१७ च्या साली किरण लोभे या तरुणाचा मृत्यू झाला होता. य....

अधिक वाचा

पुढे  

...या मतदारसंघात ९० टक्के मतदान केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाही
...या मतदारसंघात ९० टक्के मतदान केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाही

श्रीनगर लोकसभा मतदार संघांत गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्या....

Read more