ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उद्धव ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 05:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उद्धव ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

शहर : मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. 169 आमदारांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारला मिळाला आहे. यावेळी एमआयएमचे 2, मनसेचे 1, सीपीआयएच्या एका आमदाराने यावेळी तठस्थ भूमिका घेतली. तर भाजपने सभागृहातून सभात्याग केल्याने या प्रस्तावाच्या विरोधात शुन्य मतं पडली. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. तर राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि जयंत पाटील या प्रस्तावाला अनुमोदन दिले.उद्धव ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजपच्या सर्व आमदारांनी वॉक आऊट केलं. सभागृहाच्या बाहेर भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली.

फडणवीस यांचा आरोप

प्रोटेम स्पीकर बदलणं हे असंवैधानिक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशात याआधी असं कधीच झालं नाही. महाआघाडीला अशी काय भीती होती. ज्यामुळे त्यांनी हंगामी अध्यक्ष बदलला. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडल्यानंतर फ्लोर टेस्ट घेतली जाते. जो पर्यंत स्थायी अध्यक्षांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत विश्वास दर्शक ठराव मांडला जावू शकत नाही. असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मागे

'छत्रपतींच्या नावाची शपथ घेणे गुन्हा असेल तर मी प्रत्येक जन्मात करेन'
'छत्रपतींच्या नावाची शपथ घेणे गुन्हा असेल तर मी प्रत्येक जन्मात करेन'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाशिवआघाडीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार ....

अधिक वाचा

पुढे  

महिन्याभर राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा द एण्ड
महिन्याभर राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा द एण्ड

गेल्या महिन्याभर राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा द एण्ड झाला आहे. उद्....

Read more