ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

T20 World Cup 2024 आधी बीसीसीआयचा मोठा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 15, 2024 07:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

T20 World Cup 2024 आधी बीसीसीआयचा मोठा निर्णय

शहर : मुंबई

बीसीसीआय आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी तयारीला लागली आहे. वर्ल्ड कपला काही महिने बाकी असताना बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. त्यानंतर टीम इंडिया थेट आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहे. थोडक्यात काय तर, टीम इंडियाची वर्ल्ड कप आधीची अखेरची टी 20 मालिका आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 चं आयोजन विंडिज आणि अमेरिकेत 1 ते 29 जून दरम्यान करण्यात आलं आहे.

टीम इंडिया या टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने तयारीला लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयही सज्ज झाली आहे. बीसीसीआयने निवड समितीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ असा की टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा नवी निवड समिती करेल.

बीसीसीआयने मुंबईकर आणि माजी खेळाडू अजित आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी 4 जुलै 2023 रोजी नियुक्ता केली होती. या निवड समितीत अध्यक्ष आगरकर यांच्याव्यतिरिक्त इतर 4 निवडकर्ते होते. आता बीसीसीआयने निवड समितीतील पदासाठी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने निवडकर्ता या पदासाठी अर्ज मागवले आहेत.

निवड समिती बदलणार!

बीसीसीआय निवड समितीत आगरकर यांच्या व्यतिरिक्त विविध झोनचे प्रतिनिधित्व करणारे निवडकर्ते आहेत. शिवसुंदर दास हे सेंट्रल झोनचं प्रतिनिधित्व करतात. सुब्रत बॅनर्जी हे इस्ट झोनकडून निवड समितीत आहेत. साऊथ झोनमधून श्रीधरन शरत आहेत. तर वेस्ट झोनमधून सलील अंकोल आहे. आगरकर हे देखील वेस्ट झोनचं प्रतिनिधित्व करतात.

विद्यमान निवड समितीत नॉर्थ झोनचं प्रतिनिधित्व करणारा निवडकर्ता नाही. वेस्ट झोनचे 2 सदस्य आहेत. त्यामुळे सलिल अंकोला यांचा पत्ता कट करुन त्या जागी नॉर्थ झोनला प्रतिनिधित्व दिलं जाऊ शकतं. याचाच अर्थ असा की टी 20 वर्ल्ड कपसाठी नवी निवड समिती टीम इंडियाची घोषणा करेल.

अटी आणि शर्ती काय?

दरम्यान बीसीसीआयने एका जागेसाठी हे अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयने सोबतच अटी आणि शर्थीही सांगितल्या आहेत. इच्छुक उमेदवाराला किमान 7 कसोटी किंवा 30 प्रथम श्रेणी सामने अथवा 10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव असावा. तसेच अर्जदाराला क्रिकेटमधून निवृत्त होऊन 5 वर्ष झालेली असावीत. पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 25 जानेवारी आहे.

मागे

टीम इंडियाच्या एका क्रिकेटपटूने राहुल द्रविड यांचा आदेश धुडकावला, त्याची दुबईत पार्टी
टीम इंडियाच्या एका क्रिकेटपटूने राहुल द्रविड यांचा आदेश धुडकावला, त्याची दुबईत पार्टी

हेडकोच राहुल द्रविड यांचं टीम इंडियातील स्थान आणि अनुभव लक्षात घेऊन प्रत्य....

अधिक वाचा

पुढे  

Rahul dravid च्या मुलासोबत क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने ठोकल्या 404 धावा, मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं
Rahul dravid च्या मुलासोबत क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने ठोकल्या 404 धावा, मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं

राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडच्या फलंदाजीबद्दल तुम्ही ऐकल असेल. याव....

Read more